Wednesday, October 29, 2008

एक विचार

खरच आता ती वेळ आली आहे का ? मागील कही दिवसापासून चालू असलेल मराठी भाषा व मराठी माणसासाठी राज ठाकरे यांच आंदोलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पहाता मराठी माणूस जागा होतोय अस दिसत। पण ज्या प्रकारे हे आंदोलन सुरु आहे त्याचा नक्की फायदा कोणाला आणि कसा होणार आहे हे पहाणेदेखिल महत्वाचे आहे। पण अशा आक्रामक आंदोलनाची आवश्यकता आहे का ? आता या प्रश्नाला हो आणि नही अशी दोन उत्तरे आहेत। जर या प्रश्नाच उत्तर हो असेल तर आपण विचार करायला हवा आहे, कारण या सर्व गोष्टीत सामान्य माणूसच चेपला जात आहे। आपण या आंदोलनात आपल्याच मालमत्तेचा नुकसान करून घेत आहोत। आता तुम्ही म्हणाल की या सर्व गोष्टीसाठी राज्य शासन जबाबदार आहे आणि शासनाविरोधात हे सर्व कही चालू होत। हे सर्व पटतय पण आपण हा विचार देखिल करा की यात सार्वजनिक मलमत्तेच किती नुकसान झाल आहे? हे सर्व आपण भरलेल्या करातूनच उभ रहिलेल आहे , आणि आता याची परत फेड ही आपल्याच पैशातून करावी लागणार आहे , नाही का ? पण आता दुसर्या बाजूने विचार करू अशा अंदोलानाने आपण दाखवू शकलो कि सामान्य मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र येऊ शकतो। येथे सामान्य मराठी माणूस मुद्दाम लिहिला आहे कारण आपले जे कोणी नेते आहेत ते कधी एकत्र येताना दिसतच नाहीत । सर्वांची तोंड एकमेकांच्या विरोधातच आहेत। आणि तिकडे उत्तरेतले सगळे नेते आणि प्रसार माध्यम एकत्र येऊन महाराष्ट्राविषयी अगदी कहिवाही बोलत आहेत आणि तरीही हे मराठी नेते गप्प आहेत , कारण दिल्लिश्वाराविषयीची त्यांची श्रधा।
आता आपणच सुरवात करायला हवी आहे । म्हणजे करायच अस , आज पासून भाजीआणि इतर वस्तू जरी थोड्या महाग वाटल्या तरीही मराठी माणसाच्या दुकानातूनच घ्यायच्या। इतर बरीच काम आपण मराठी माणसाकडून करून घ्यायची आणि मग बघू हे भैय्ये इथे रहूच कसे शकतात। थोड़ा तरस होइल पण हे आपण आपल्यासाठी करत आहोत हे लक्षात ठेवू.
लिहायच अजून आहे पण आता नंतर ......

मराठी स्पंदन असलेला नवा ब्लॉग

नमस्कार,
मागील काही दिवसापासून एक नविन मराठी ब्लॉग जो मराठी जनासाठी मराठी मनातून स्फूरलेला माय मराठी ब्लॉग चालू करावा असा विचार आम्हा मित्र परिवारामधे चालू होता आणि आज पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर हा ब्लॉग चालू करत आहोत।
हे एक मराठी स्पंदन, मराठी मनाचा ध्यास आहे।
आम्हाला आपल्या प्रतिसादाची एक आस आहे.

धन्यवाद।

आपले,
आपण मराठी